Sunday, September 23, 2007
KAVITA
संपलो नाही कधीच मी पुरून उरलो होतोविझलो नाही पुन्हां मी विझुन पेटलो होतोतुझ्या श्वासाने झालो मी पुन्हां निखारात्या राखेत कोळसा मी बनुन पडलो होतो.तुला वाटले माझी राख झाली ती कधीचीधुरावाटे त्या आभाळास मी भिडलो होतोकोसळला नाहि तो पहीला पाऊस तेव्हांपावसाआधी ढगातुन त्यावेळी मी बरसलो होतोस्वखुशीने तुही भिजलिस सरीत आसवाच्यांतुझ्या खुशीसाठी मी डोळ्यात साठलो होतोतुला जाण नाही आसवाच्या चवेची आजहीतो सागर नव्हता त्यात मी विरघळलो होतो.गंध होता हवेत माझ्या अस्तित्वाचा नेहमीश्वासावाटे तेव्हां तुझ्या मी काळजात शिरलो होतो.तुला वाटले मी दुर गेलो आता भेट नाहीमनात डोकावल नाहीस मी मनात मुरलो होतोजेव्हां ओघळलीस तु... डोळ्यावाटे मीही मुक्त झालोइतके दिवस तुझ्या मी डोळ्यात उरलो होतो.नेहमीच राहीन जिवंत असा तुझ्या आठवणीतदेह संपला तरी तुझ्या मी देहात साठलो होतो.तु कणा कणात शोधलस मी क्षणा क्षणात होतोअगं कुठेच गेलो नव्हतो मी तुझ्यात सरलो होतो.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment